साक्षरतेचे महत्व मराठी निबंध | Saksharta che mahatva marathi nibandh

साक्षरतेचे महत्व निबंध मराठी | Saksharta che mahatva marathi nibandh


संगणक साक्षरता काळाची गरज निबंध saksharta che mahatva marathi nibandh

निबंध प्रस्तावना: 

आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे. असे म्हटले जाते की, "जे युद्ध तलवारीने जिंकले जात नाही ते पेनाच्या शक्तीने जिंकू शकतो". आणि ही गोष्ट अतिशय सत्य देखील आहे. कारण पेन पकडता येणे हेच मुळात साक्षरतेचे प्रमाण आहे. 

साक्षरता म्हणजे काय ?

साक्षरतेचा अर्थ देशातील अशिक्षित लोकांना शिक्षित करून वाचन व लेखन करण्यायोग्य बनवणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर साक्षर असणे म्हणजे वाचन व लेखन करण्याची योग्यता प्राप्त करणे होय. भारतात राष्ट्रीय साक्षरता मिशन अनुसार जर एखादा व्यक्ती आपले नाव लिहिणे व वाचण्या योग्य असेल तर तो साक्षर आहे. 


वर्तमान काळात शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे. शिक्षण ही जीवनातील एक आवश्यक बाब आहे. याशिवाय अशिक्षित लोकही आपल्याच समाजाचा भाग आहेत. आणि त्यांना साक्षर करणे आपले कर्तव्य आहे. कारण जर एखाद्या देशाचा प्रत्येक नागरिक साक्षर असेल तरच त्या देशाची प्रगती होईल. साक्षरतेचा संबंध देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाशी आहे. शिक्षणाशिवाय व्यक्तीचे जीवन पशूप्रमाणे होते. 


साक्षरतेचे महत्व:

भारताला गावांचा देश म्हटले जाते. कारण आपल्या देशातील बहुसंख्य लोक खेड्या गावात राहतात. या लोकांमध्ये शेतकरी मजूर इत्यादींची संख्या अधिक आहे आणि सर्वात जास्त अशिक्षित व निरक्षर हेच लोक आहेत. अश्या काळात अशिक्षिततेचा फायदा घेऊन अनेक चतुर व्यापारी, कुटील नेते आणि सरकारी अधिकारी यांचा आपल्या कार्यासाठी लाभ करून घेतात. 


निरक्षर लोक शासनाकडून आलेल्या योजना व्यवस्थित समजू शकत नाही व यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. साक्षर लोक शासनाच्या योग्य निर्णयांमध्ये सहयोग करतात आणि चुकीच्या निर्णयांचा विरोध देखील करतात. साक्षर व्यक्तीला आपल्या मताची किंमत माहिती असते. म्हणून तो योग्य नेत्यालाच आपले मत देतो.


आपला देश कृषिप्रधान देश आहे. जर या देशातील शेतकरी साक्षर असेल तरच तो शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करू शकतो. शिकलेले शेतकरी वैज्ञानिक पद्धतीने शेती करतात. ते नवनवीन आधुनिक उपकरणांचा उपयोग करून शेतातून अधिक धान्य उत्पन्न करतात. आणि आपल्या गावाचा व देशाचा विकास करतात. 


ज्याप्रमाणे पुरुषांसाठी शिक्षणाचे महत्त्व आहे त्याच पद्धतीने स्त्री शिक्षण देखील अत्यावश्यक आहे. एक शिक्षित महिला आपली मुले व कुटुंबातील इतर सदस्यांना शिक्षित करते. यासोबतच नोकरी व व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक सहयोग पोहचवते. यामुळे कुटुंबास लवकर समाजाची प्रगती होते. 


कमी साक्षरतेमुळे देशाला केवढे नुकसान होते हे त्या देशातील विकासदरावरून लक्षात येते. जगभरातील साक्षरतेचे महत्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने 17 नोव्हेंबर 1965 ला 8 सप्टेंबर चा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 1966 मध्ये पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी हा दिवस 8 सप्टेंबर ला साजरा केला जातो. 


आपल्या देशात आजही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अशिक्षित आहे. यामागील कारण असे आहे की आजही अनेक खेड्या गावांमध्ये योग्य तो उपलब्ध नाही. आणि आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थी प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून समाज व शासन दोघांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून, मुलगा असो वा मुलगी शिक्षणाला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करायला हवे. शिक्षण वाढेल तर लोक साक्षर होऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतील आणि यामुळे देशही प्रगत होईल.

संगणकाची माहिती वाचा येथे 

संगणक शाप की वरदान निबंध 


आज साक्षरता काळाची गरज झाली आहे. आशा करतो की saksharta kalachi garaj marathi nibandh हा तुम्हाला आवडला असेल, ह्या निबंधाला आपल्या मित्र मंडळीसोबतही शेअर करा. धन्यवाद. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने