तंत्रज्ञानाची किमया / महत्व मराठी निबंध | tantradnyanachi kimaya marathi nibandh

तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध | tantradnyanachi kimaya marathi nibandh | importance of technology marathi

नित्य जगभरात होणाऱ्या नवनवीन शोधांमुळे मानवी जीवन सोपे-सुलभ झाले आहे. आज आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या लोकांशी संपर्क प्रस्थापित करू शकतो, हे फक्त आणि फक्त तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. आजच्या या लेखात तंत्रज्ञानाची किमया (tantradnyanachi kimaya) या विषयावर मराठी निबंध देण्यात आला आहे. याशिवाय तंत्रज्ञानाचे उपयोग व दुरुपयोग यांच्यावरही चर्चा करण्यात आली आहे. तर चला importance of technology marathi सुरू करूया...


तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध आणि  तंत्रज्ञानाचे महत्व

तंत्रज्ञानाची किमया निबंध | tantradnyanachi kimaya 

तंत्रज्ञानाचे महत्व 

आजच्या आधुनिक काळात तंत्रद्यानाने आपले जीवन खूप सरल केले आहे. मनुष्याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःची प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाने जीवनाला सोपे, आरामदायी आणि अनेक सुविधांनी सुसज्ज केले आहे. आजच्या समाजाने केलेल्या प्रगतीची आधीच्या काळात कल्पना करणे देखील कठीण होते. तंत्रज्ञानाने फक्त मनुष्याचे राहणीमान सुधारले नसून, देश आणि जगाच्या विकासातही क्रांतिकारी बदल केले आहे, शिवाय ही गोष्ट वेगळी आहे की, वाढत्या तंत्रज्ञानाचा खूप प्रभावही समाज आणि समाजातील मनुष्यावर पडत आहे. म्हणून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. 


तंत्रज्ञान आणि नवनवीन शोधांमुळेच मनुष्य हा आदिमानवापासून आजच्या प्रगत मानवापर्यन्त प्रवास करीत आला आहे. अश्मयुगीन काळात आग आणि चाकाचा शोध लावण्यात आला. याच मूलभूत शोधांमुळे मानवाची विज्ञानातील आवड वाढत गेली व त्याने लहान-मोठे प्रयोग करीत अनेक शोध लावले. 


कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्व 

वर्तमान काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेतले जात आहे. आज आपल्याकडे उत्तम प्रकारचे बी, खत, कीटकनाशक आणि औषधी उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. नवीन नवीन ट्रॅक्टर, कृषी उपकरणे इत्यादींच्या मदतीने कमी वेळात शेती शक्य झाली आहे. 


शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्व 

शिक्षणाच्या क्षेत्रातही विज्ञानाचे ऐतिहासिक प्रगती केली आहे. आजकाल विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लासेस द्वारे लाईव्ह व्हिडिओ आणि चित्रे दाखवून शिकवले जाते. आज कॉम्प्युटर, मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने विद्यार्थी जगाच्या कोणत्याही खूप कोपऱ्यात घरी बसल्या शिक्षण घेऊ शकतो, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काही सेकंदांमध्ये मिळवू शकतो. 


वाहतूक क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्व  

प्रवासाच्या क्षेत्रातही तंत्रज्ञानाचे महत्व अनन्य साधारण आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज प्रवासाचे अनेक साधन उपलब्ध झाले आहेत. वेगवान बुलेट ट्रेन, आधुनिक विमाने हजारो किलोमीटरचे अंतर काही तासातच पूर्ण करतात. जेट विमानाच्या मदतीने भारतातून अमेरिकेला जाण्यासाठी फक्त पंधरा तासांचा कालावधी लागतो. 


वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्व 

याशिवाय मेडिकल उपचार क्षेत्रात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आधीच्या काळात ज्या रोगामुळे हजारो लोक मारले जायचे त्यांचा इलाज करणे आज शक्य झाले आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने कॅन्सर, मधुमेह, एड्स, हृदय रोग इत्यादींचा इलाज करता येत आहे. सिटीस्कॅन, एम आर आय, एक्स-रे यासारख्या आधुनिक यंत्रांनी उपचार करण्याचा वेग अधिकच वाढवला आहे. अमेरिका सारख्या अतिप्रगत देशात रोबोट्स च्या मदतीने सर्जरी केली जाते. मनुष्याने कृत्रिम हृदय, डोळे, हात, पाय इत्यादी अवयवांच्या शोध देखील लावला आहे. 


मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्व 

मनोरंजनाचे क्षेत्र पाहिले तर यातही खूप प्रगती झाली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲनिमेशन चित्रपट बनवले जात. आता आपल्या देशात 3D सिनेमा हॉल देखील तयार होत आहेत, ज्या मध्ये 3D चित्रपट दाखवले जातात. हे चित्रपट पाहणाऱ्याला असे भासते की जणू तो स्वतः चित्रपटाच्या त्या ठिकाणी उभा राहून दृश्य पाहता आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन इत्यादी मनोरंजनाची प्रमुख साधने आहेत. मनोरंजनाशिवाय जगभरात सुरू असलेल्या घडामोडींवर देखील या उपकरणांच्या सहाय्याने दृष्टी ठेवता येते. 


तंत्रज्ञानाचा गैरवापर / तोटे / नुकसान /दुरुपयोग

तंत्रज्ञानात झालेला इत्यादी सर्व ऐतिहासिक प्रगतीमुळे आज आपला देश व संपूर्ण जग प्रगतिपथावर पुढे जात आहे. परंतु आज देशा देशांमध्ये एकमेकांपासून पुढे जाण्याची स्पर्धा लागली आहे. प्रत्येक देश स्वतःला शस्त्र शक्तीने संपन्न करू इच्छितो. रॉकेट, बंदुके, बॉम्ब व अनेक विध्वंसक हत्यार तंत्रज्ञानाची च देणं आहेत. ही सर्व हत्यारे मानवी विनाशासाठी नेहमी तयार आहेत. याचेच एक उदाहरण द्वितीय महायुद्धातील आहे. या युद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले, ज्यामध्ये लाखो लोक मारले गेले आणि आजही तेथे जन्म घेणाऱ्या अनेकानेक पिढ्यांवर याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळत आहेत.  


तंत्रज्ञानाच्या शोधांमुळे लोकांमधील धार्मिक विश्वास व प्रेम देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. असंतोष स्वार्थ व लालचीपणा वाढत आहे. सभ्य समाजासाठी हे संकेत योग्य नाहीत. मनुष्याच्या भल्यासाठी शोधण्यात आले तंत्रज्ञान त्याला विनाशाकडे नेत आहे. जर विज्ञानाने मनुष्याला चंद्रावर पोहोचवले आहे तर दुसरीकडे त्याने आपल्याला विनाशाच्या गर्भातही उभे केले आहे. तंत्रज्ञानाची शक्ती अगाध आहे. आवश्यकता फक्त एवढी आहे की तंत्रज्ञानाचा उपयोग सुबुद्धी आणि विवेकाने करायला हवा. जेणेकरून हे तंत्रज्ञान संपूर्ण मानवासाठी एक वरदान म्हणूनच सिद्ध होईल.

--समाप्त--


तर मित्रांनो हा होता तंत्रज्ञानाची किमया / तंत्रज्ञानाचे महत्व मराठी निबंध. आशा आहे की हा importance of technology marathi essay तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. 


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने